'अतुलनीय' - पुण्याचा 'पेठा' !


आज अतुल समोर येणार आहे आणि म्हणून मी नाटक कधी 'एकदाचंसुरु होतंय याची वाट बघतोयकारण त्याला नट म्हणूनपहिल्यांदा बघणार आहेपहिली आणि तिसऱ्या घंटेमध्ये जे विचार आन्दोलनं करून गेले ते ... 


कालच अतुल 'लोकसत्तामध्ये भेटला होता - पुरुष हृदय बाई - या सदरातकाहीतरी वेगळं आणि पुरुषांना विचार करण्यास भागपाडणारं लिहिलंयपुरुष आणि स्त्री या लिंगभेदाच्या पलीकडे होऊन 'निखळ माणूसहोणं हे महत्वाचं आणि तसं होता येतं - या वरचाउहापोह मस्तलिहिता लिहिता एक सुंदर पुस्तकही सुचवलं - my body is mine हेलेखाच्या शेवटी 'अतुलनिरपुरुष कसा झाला हेसांगितलं - केवळ 'अतुलनीय'. 


त्या आधी अतुल मला कालिदास नाट्यमंदिरात भेटला होतादिसला होता असं म्हणणं जास्त योग्य. 'समाजस्वास्थ्यचा प्रयोग होताअन प्रयोग सुरु होण्या आधी गिरीश आणि अतुल स्टेजच्या खाली उभे होते - प्रेक्षकांना काही सांगण्यासाठीअतुलने दोन मिनिटातनाटकाविषयी काही सांगितले तितक्यात एका उत्साही रसिकाने अतुलच्या सर्जनशीलतेविषयी प्रश्न विचारला आणि नाटकातून काहीमेसेज देता येतो काअशी पृच्छा केलीत्यावर अतुल म्हणाला, 'मी मनात येईल ते करून मोकळा होतोसर्जनशीलतेच्या प्रक्रियेकडेविशेष लक्ष नसतंखरंतर हे सहज घडून जातंआणि मेसेज वैगरेंच्या भानगडीत मी पडत नाहीनाटक मस्त एन्जॉय करायचंत्यानेसहेतुक गिरीशकडे बघितलं अन नजरेने विचारलं की 'तुला काही सांगायचं आहे'. गिरीश मानेनंच 'नाहीम्हणालाअतुलनेसांगितल्याप्रमाणे गिरीशने 'भूमिका'* मस्त 'उठवली' - अतुल 'दिग्दर्शकम्हणून अतुलनीय ..


मकरंद साठे यांनी लिहिलेले ‘सूर्य पाहिलेला माणूसहे बहुदा डॉक्टर लागू यांचं शेवटचं नाटकअत्यंत उतुंगहे नाटक त्यांचं सर्वात जास्तआवडतं - असं डॉक्टर म्हणाले होतेबहुदा मतकरी मुलाखत घेत होते. 'चौकातील विद्वानाचीकथा अप्रतिम 'मांडलीआहे अतुलने - दिग्दर्शन भन्नाटमी नेहमी नाटकाला 'सामोरंजातांना रिक्त मनाने जातोलिहिलंय कोणीदिग्दर्शक कोणकथा सूत्र काययाविषयीखूप माहिती घेत नाहीउगाचच पूर्वग्रह नकोआणि अपेक्षाभंगाचं दुःख नकोनाटक पाहिल्यावर भारावलो - तत्कालीन आणि आत्ताचीपरिस्थिती यात काहीच फरक नाहीअसं जाणवलंया नाटकात 'डारेक्टरचं अस्तित्व गच्च भरलंयनंतर लेखक आणि नंतर नटकेवळअतुलनीय


अतुल पेठे हा नाट्यधर्मी आहेहाडाचा प्रायोगिकअस्वस्थनाटकातून व्यक्त होणारा आणि स्वतःबरोबर प्रेक्षकांना देखील अस्वस्थकरणाराम्हणून तो मला आवडतो - पुण्याचा पेठा ! कोणीतरी कानात सांगितलं - अरे तो नाशिकचा आहे ...


तिसरी घंटा झालीमनातली आंदोलनं आवरती घेतली आणि पुनश्च एकदा रिक्त मनानं ....शब्दांची रोजनिशी - नाटक बघायला मांडीघालून बसलोइप्टा आणि नाटकघर सादर करत आहे ...... 

--------------------------------


*समाजस्वास्थ्य या नाटकात लैंगिकतास्त्री-पुरुष संबंधव्यभिचार या विषयांवर लिहिणाऱ्याबोलणाऱ्यासंततिनियमनाचा प्रसारस्वतःच्या घरापासून करणाऱ्यात्याविषयी विविध प्रयोग करणाऱ्या रघुनाथ धोंडो कर्वे या द्रष्ट्या माणसावर अश्लिलतेचा आरोप ठेवूनगुदरलेल्या तीन खटल्यांची प्रकरणं दिसतातत्यातले दोन खटले ते हरतातडॉबाबासाहेब आंबेडकरांसारखे मातब्बर वकिल दिमतीलाअसूनही हरताततिसऱ्या खटल्यातून तांत्रिक मुद्द्यावर कसेबसे सुटतातआणि तरीही त्यांच्यावर चौथा खटला गुदरला जातोचपणसुदैवाने वा दुर्दैवाने रघुनाथराव तेव्हा हयात नसतातइतकं मोठं काम करणारा माणूस निधन पावला हे सरकारच्या गावीही नसतंसंस्कृतीरक्षक मात्र जिवंतच असतात आणि राहतात.

0/Post a Comment/Comments