गोष्टीचं 'निर्माण' अन सांगणं





आज सकाळी अंमळ उशिरा उठलोसात वाजतासायकलिंगचा मोह टाळलाम्हटलं आज 'चालू जरा'. बूट पायात अडकवत असतांनाबागेतल्या 'घंटीजास्वदींकडे लक्ष गेलंफुलांचा पारिजातकाप्रमाणे सडा पडला होताते पाहून मन आनंदित होत होतंउल्का कालचम्हणाली होती की गेली आठ दिवस ती तिच्या मैत्रिणीला दररोज देवाकरिता फुलं पाठवत आहेआज उल्का घरी नव्हतीम्हणून मी फुलंवेचली आणि 'पर्डीभरली


*पर्डी - जुना शब्दआणि लगेच हाक ऐकू आलीआजीची. 'अनिलम्हणजे मीपर्डी घेऊन खाली जा आणि पारिजातकाची ५००० फुलंमोजून आण'. श्रावणातले ते १९६५-७० चे दिवस भर्रकन डोळ्यासमोर निघून गेले. 'त्या सकाळच्या गारव्यानंअंग आता शहारलंकायजादू आहे शब्दातजोगवा मागायचे पात्र म्हणजे परडीअंबाबाईच्या पूजेतील अतिशय महत्त्वाची बाबपरडीपरसरामपोत आणिकवड्याची माळ यासोबत परडीला महत्त्व आहेही अंबाबाईच्या पूजेची प्रतीके आहेत.नवरात्रात परडीची विक्री मोठ्या प्रमाणात होतेपरडी म्हणजे ताट आणि परसराम म्हणजे वाटीआमची वेताची फुलांसाठी बनवलेली पर्डी बारीक वीण करून बनविली होतीपर्डी जपूनठेवली असती तर .... आजीला स्पर्श केल्याचं समाधान मिळालं असतंमाणूस आणि वस्तूंचा आपण संबंध आपण मनावर कोरूनठेवतो.*


या पर्डीभर 'घंट्यांचंकाय करायचंया प्रश्नासह मी माझा मॉर्निग वॉक सुरु केलाउल्का घरी नसल्याने त्या फुलांचा घरी उपयोग नाहीविचार करत करत गंगापूर रोडवर चालू लागलोजाई-जुई बंगल्यासमोर पोहचलोहा बंगला विनयाचा१९७६-८० ची मैत्रीणविनयाआणि प्रदीप ( तिचा नवरा ) नेहमी आमच्या परिसरात चाफ्याची फुलं वेचायला येतातअचानक वीज चमकलीवेगळ्या विचाराचीप्रदीपला फोन केला आणि सांगितलं ' तुमच्या देवांसाठी फुलं आणलीखाली या'. मोठा पॉझ घेतल्यानंतरप्रदीप म्हणाला - 'विनयालापाठवतो'. निम्मी फुलं घेतांना विनयाच्या चेहऱ्यावर 'आश्चर्यमिश्रितआनंद बघितलामानकर कधी फुलं घेऊन येईल असा विचारहीविनयाने केला नसेल. 'वर चलचहा घेऊ' - विनयामी मोठ्या विनयाने 'नकोम्हणालो ( कारण नुकताच झाला होता). मलाही आनंदझाला - काहीतरी वेगळं केलं म्हणून


मी पुढे चालत राहिलोसिब्बल हॉटेल पर्यंत पोहचलोतेवढ्यात वासू खेडकरची आठवण झालीमैत्री १९८० पासूनचीमागे दोनदा तीनदाफोन केला तेंव्हा वासू पूजा करीत होतावासूला फुलं देणं म्हंजे देवापर्यंत 'नक्कीजाणारसोवळं नेसून पूजा करणारा भक्तवासूलाफोन केला -'खाली ये आणि फुलं घेऊन जाअसं सांगितलंत्यावर वासू म्हणाला 'वर येचहा घेऊ'.  त्यावर मी म्हणालो 'मी जेवायलाबोलावल्याशिवाय कोणाकडे जात नाही!'. निरुत्तर वासू पटकन खाली आलामी त्याची ओंजळ उरलेल्या फुलांनी भरलीवासू आनंदीझालामी फुलं घेऊन जाईन असं त्याला कधीही वाटलं नसेल


पर्डी रिकामी झाली. 'डोईजडझालेली फुलं योग्य त्या ठिकाणी गेली म्हणून मीही आनंदी झालोघरी आलो तेंव्हा सहा किलोमीटर वॉकझाला होतामी शांत अन समाधानी होतोयेतांना 'पांढरीशुभ्र काटे कोरांटीचीफुलं दिसलीसुनेच्या देवासाठी ती तोडली ... पर्डी परतभरलीभा रा तांबे यांची कविता आणि त्या ओळी आठवल्या - *नैवेद्याची एकच वाटी

अता दुधाची माझ्या गाठींदेवपुजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणीं कशी तरी.* कविवर्य भा.रा.तांबे यांची ही कविता म्हणजे अंथरुणालाखिळलेल्या जर्जर माणसाने अंतसमयाची चाहूल लागल्यावर जणू मृत्यूशी केलेली गुजगोष्टच आहे…..


मी तर 'आयुष्याशीबोलत आहेपर्डी भरणं आणि रिकामी करणं


वाचकहोया नॅऱ्याटिव्ह मध्ये तुम्हांला एखादी 'गोष्टदिसली कासकाळी सकाळी मी 'आनंद ' निर्मित केला... याची ही गोष्ट होईलका


0/Post a Comment/Comments