मिंटो


 (भारतीय की ) पाकिस्तानी 'मंटो' ?


आयुष्य नेहमी सरळ रेषेत नसतं ( कोणी म्हणेल - म्हणून तर मजा आहे ). सर्जनशील कलाकाराचं तर नसतंच नसतंत्यातून 'समाजाचाकॅनव्हास बदलला तरतर ते वेगवेगळ्या (भयावहरंगानी आणि रेषांनी भरून जातंकलाकाराने जर देश बदलला तर 'वेदनाच वेदना'. हेलिहीत असतांना मला 'चित्रकार अमृता शेरगीलआठवत आहेजर कलाकाराला एखादं व्यसन असेल तर .... शोकांतिका अटळअसते


नुकताच मी तीन तास चोपन्न मिनिटांचा 'मंटोहा पाकिस्तानी सिनेमा बघितला. ( https://youtu.be/7iMUh8mWB20 सुन्नझालोसाहित्य निर्मिती होतांना ज्या वेदना होतात त्याची किंचित अनुभूती घेतलीकोण आहे 'मंटो'? काही व्यक्तिमत्वांनी भारत आणिपाकिस्तान दोन्ही देशांमध्ये आपली छाप सोडलीत्यातलेच एक आहेत सादत हसन मंटो - कथाकार


मंटो सामान्य माणसाच्या जगण्याचा संघर्षत्याची गरिबीदारिद्र्यअसाहय्यता तटस्थपणे मांडतात... मंटो हा स्वातंत्र्य चळवळीच्याकाळातला प्रसिद्ध लेखक होतात्याचं लेखन प्रामुख्यानं समाजाच्या अंधाऱ्या अन उघडपणे असभ्य समजल्या जाणाऱ्या लोकांविषयीहोतंवास्तववादी होतंत्याच्यावर सहा खटले सुद्धा भरले होते पण तो त्यातून सुटला होतात्याच्या कथेतील 'पात्रत्याला सारखे त्रासद्यायचे - जो पर्यंत तो कथा लिहीत नसे तोपर्यंयमनात येईल तेंव्हाच लिहीन असा अट्टाहास करणारा लेखक खूप दारू प्यायचाकथाप्रसूत होतांना त्याला त्रास व्हायचातो 'मानसिक आरोग्याचाशिकार झाला होता काफाळणी नंतर त्याला मुंबई सोडून पाकिस्तानातजावं लागलं - यामुळे त्याच्या कलाकारीत फरक पडला का ? पाकिस्तानातील 'कम्युनिस्टांनीत्याचा छळ केला कागायिका नूरजहाँआणि त्याचे .....  अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ह्या सिनेमात 'किंचितमिळतातमी फार पूर्वी त्यांच्या कथा वाचल्या होत्या त्यामुळेलेखकाची 'शोकांतिकाबघितल्यावर मी सुन्न झालो होतोसिनेमात उर्दू चा खूप वापर असल्याने कधीकधी सिनेमा समजत नाहीमंटोसमजून घेणे म्हणजे जीवन समजून घेण्यासारखे आहेमंटो समजण्यासाठी त्यांचे लिखाण वाचणे आवश्यक आहे आणि ते वाचल्यानंतरमंटो आपोआपच तुमच्या मनावर गारूड करतोमंटो यांनी आयुष्यभर प्रखर वास्तव मांडणा-या कथा लिहिल्यासत्याचे दुसरे नावच मंटोआहेहा पाकिस्तानी सिनेमा त्याची कथा आहे


२८/१०/१९५१ रोजी सआदत हसन मंटो म्हणाले होते कीमी चालती-बोलती मुंबई आहेमंटोंचे मुंबईशी जुने नाते होतेतेथील वास्तव्यातत्यांनी अनेक प्रसिद्ध कथा लिहिल्यामंटो यांनी आपले एक चतुर्थांश आयुष्य मुंबईत घालवलेते १९३७ मध्ये मुंबईत आले १९४८ पर्यंतते येथे राहिले आणि नंतर पाकिस्तानात निघून गेलेतेथे आयुष्यातील अखेरची काही खळबळजनक वर्षे त्यांनी घालवली


*नंदिता दास यांनी सुद्धा 'मंटोवर सिनेमा तयार केला आहेतो आता बघतो. (https://youtu.be/DAF7qSgjUW4) - लिंक चेककरानंदिता दास म्हणते - मंटो फिल्म में मुझे जो मिला वो एक फिल्म निर्देशक की आधी-अधूरी ‘रिसर्च’ थीवर्षों से सोशल मीडियाकी खूंटी पर टंगे हुए मंटो के चीथड़े थे और इन सबसे कहीं ज़्यादा स्त्रीवाद बल्कि ‘फेमिनिज़्म’ का इश्तिहार था.*


*तुम्हीं हे सिनेमे पहाएकाच विषयावर दोन सिनेमे - दृष्टिकोन - पहा.*


0/Post a Comment/Comments